शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वेस्ट इंडिजच्या चुकीला माफी...

By admin | Published: April 23, 2016 4:11 AM

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ २०१४ साली क्रिकेट मालिका मध्येच सोडून गेल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर केलेल्या ४ कोटी २० लाख

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ २०१४ साली क्रिकेट मालिका मध्येच सोडून गेल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर केलेल्या ४ कोटी २० लाख डॉलरच्या दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही माहिती दिली. या मालिकेतील राहिलेले सामने आता २०१७ साली खेळले जाणार आहेत. त्यासाठी वेस्ट इंडिज संघ पुन्हा भारताचा दौरा करेल. वेस्ट इंडिज बोर्डाशी वाद झाल्याने खेळाडूंनी हा दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर बीसीसीआयने वेस्ट इंडिज बोर्डावर दंडात्मक कारवाई केली होती. याविषयी माहिती देताना मनोहर म्हणाले, ‘‘वेस्ट इंडिज बोर्डाशी झालेल्या चर्चेत बीसीसीआयने केवळ दोन्ही संघांत पुन्हा सामने व्हावेत यावरच चर्चा केली. त्या वेळी अपूर्ण राहिलेल्या सामन्यांच्या मालिकेची कार्यक्रमपत्रिका मे महिन्याच्या अखेरपर्यंत ठरेल.’’ वेस्ट इंडिज बोर्डाचे अध्यक्ष डेव्हिड कॅमेरून म्हणाले, ‘‘भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे.’’ आॅक्टोबर २०१४ साली ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली विंडीज भारत दौऱ्यावर आला होता. त्या वेळी पाच एकदिवसीय, एक टी-२० व तीन कसोटी खेळले जाणार होते. मात्र, मानधनावरून क्रिकेट मंडळाशी मतभेद झाल्याने चार एकदिवसीय सामन्यांनंतर खेळाडू मायदेशी परतले होते. या मालिकेतील अखेरचा सामना धरमशाला येथे खेळण्यात आला होता. (वृत्तसंस्था) >‘‘वेस्ट इंडिज संघ २०१४ साली भारत दौरा अर्धवट सोडून गेल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या बोर्डाला ४ कोटी २० लाख डॉलरचा दंड ठोकला होता. मात्र ही दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही क्रिकेट मंडळातील कडवेपणा संपुष्टात आला आहे. भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून, तेथे ४ कसोटी सामने खेळेल. तर २०१४ साली अपूर्ण राहिलेल्या दौऱ्यातील सामने पूर्ण करण्यासाठी वेस्ट इंडिजदेखील भारत दौरा करणार आहे. - शशांक मनोहर, अध्यक्ष, बीसीसीआय