शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

धोनी किंवा युवराजच्या जागी विराट ऋषभ पंतला संधी देणार का?

By admin | Published: June 26, 2017 8:29 AM

कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

पोर्ट ऑफ स्पेन, दि. 26 - दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने अँटीग्वा येथे होणा-या तिस-या वनडेमध्ये संघात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही एकत्र बसू आणि संघात काय बदल करता येऊ शकतात यावर चर्चा करु. काही नव्या चेह-यांना संधी मिळू शकते असे विराटने सामन्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत सांगितले. 
 
दिल्लीच्या ऋषभ पंतच्या नावाची जोरदार चर्चा असून, त्याला तिस-या वनडेमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यष्टीरक्षक, फलंदाज असलेल्या ऋषभने यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार फलंदाजी केली होती. सध्या युवराज सिंगचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फटकावलेले अर्धशतक वगळता युवराजला अद्याप लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 
आणखी वाचा 
अजिंक्यच्या दमदार शतकाने भारताचा वेस्ट इंडिजवर 105 धावांनी विजय
 
वेस्ट इंडिज दौ-यावर पहिल्या वनडेमध्ये युवराजने फक्त 4 धावा केल्या होत्या. दुस-या सामन्यात त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. दुस-या बाजूला महेंद्रसिंह धोनी फॉर्ममध्ये असला तरी, युवराज आणि धोनीच्या वयाचा मुद्दा विचारात घेण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांनी 2019 मध्ये होणारा वर्ल्डकप लक्षात घेता धोनी आणि युवराजच्या भूमिकेबद्दल निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले होते. ऋषभ यष्टीरक्षक असल्यामुळे तिस-या वनडेमध्ये धोनी किंवा युवराजला विश्रांती देऊन त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. 
भारताचा दमदार विजय 
दरम्यान अजिंक्य रहाणेचे दमदार शतक (103) व शिखर धवन (63), कर्णधार विराट कोहली (87) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. यासोबतच 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
 
या सामन्यात फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने निर्धारीत 43 षटकात वेस्ट इंडिजविरुध्द 5 बाद 310 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 43 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 205 धावा बनवू शकला.