शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

विंडीज पदाधिकाऱ्यांनी पावले उचलणे आवश्यक

By admin | Published: July 02, 2017 12:10 AM

पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या

-सौरव गांगुली  पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या समृद्ध भूतकाळाचा विचार केल्यानंतर त्यांचा घसरत जाणारा आलेख बघणे जागतिक क्रिकेटसाठी चांगली बाब नाही. येथील क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विंडीज क्रिकेटला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे. विंडीजच्या नैसर्गिक आक्रमक क्रिकेटविना जागतिक क्रिकेटची रंगत काही प्रमाणात नक्कीच ओसरेल. विंडीज क्रिकेटचा आलेख उंचावण्यासाठी काय करता येईल, यासाठी कॅरेबियन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकर पावले उचलण्याची गरज आहे. दोन लढतींमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पाचही लढतींमध्ये आपण खेळणार आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे आणि त्याची झलक त्याच्या खेळामध्ये दिसून आली. कोहलीने रहाणेसारख्या खेळाडूसोबत चर्चा करायला हवी आणि त्याला संघातील त्याची भूमिका समजावून सांगायला हवी. त्यामुळे रहाणेसारख्या खेळाडूला आपला खेळ उंचावता येईल आणि त्याला त्याचे संघातील महत्त्वही कळेल. चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे कुलदीप यादव आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. विशेषत: पाटा खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान पाटा खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटू निष्प्रभ भासले. त्यामुळे फिरकीला अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर संघात कुलदीपसारख्या गोलंदाजाची गरज असते. गोलंदाजीतील विविधतेमुळे कुलदीप भारतीय वन-डे संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. सध्याची परिस्थिती बघता भारतीय संघाने या मालिकेत ४-० ने बाजी मारली तर आश्चर्य वाटणार नाही. वेस्ट इंडिज संघाबाबत अधिक चर्चा करण्यासारखे नाही. सध्याचा विंडीज संघ या मालिकेत काही चमत्कार घडवेल, असे वाटत नाही. विंडीजचे क्रिकेट प्रेम जगजाहीर असताना स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्या बघितल्यानंतर दु:ख वाटते. अनेक लोककला लाभलेल्या या बेटांवर कॅलिस्पोचे धुंद करणारे बिट कानावर पडले नाहीत तर चुकल्यासारखे वाटते. (गेमप्लॅन)