शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

महिला क्रिकेट विश्वचषक : भारताचा विजयी ‘चौकार’

By admin | Published: July 05, 2017 10:45 PM

सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने चौथ्या लढतीत सुद्धा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

डर्बी : दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांच्या शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवताना श्रीलंकेला १६ धावांनी नमवले. भारताने प्रथम ५० षटकात ८ बाद २३२ धावा उभारल्यानंतर, श्रीलंकेमे ५० षटकात ७ बाद २१६ धावा काढल्या.

धावांचा पाठलाग करताना लंकेने सावध सुरुवात केली. दिलानी मनोदरा (६१), शशिकला सिरिवर्देने (३७) आणि निपुनी हंसिका (२९) यांच्या जोरावर श्रीलंकेने आपले आव्हान कायम राखले होते. परंतु, अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी २ बळी घेत लंकेची कोंडी केली. दीप्ती आणि एकता बिस्त यांनीही प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला. कांऊटी मैदानावर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्विकारली. परंतु, पूनम राऊत (१६) आणि स्मृती मानधना (८) या फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीरांना झटपट बाद करुन श्रीलंकेने भारताचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर राज - शर्मा या जोडीने ११८ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन भारताला सावरले. ही जोडी भारताला मोठी मजल मारुन देणार अशी अपेक्षा असताना अमा कांचना हिने शर्माला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर भारतीयांनी आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात विकेट फेकल्याने धावसंख्या मर्यादित राहिली. शर्मा परतल्यानंतर झूलन गोस्वामी (९) व मिताली पाठोपाठ परतल्याने भारतीय फलंदाजी काहीशी दडपणाखाली आली. हरमनप्रीत कौर (२०) आणि वेदा कृष्णमुर्ती (२९) यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पलीकडे मजल मारण्यात यश आले. श्रीलंकेच्या श्रीपाल वीराकोडीने ३ आणि इनोका रणवीराने २ बळी घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :भारत : ५० षटकात ८ बाद २३२ धावा (दीप्ती शर्मा ७८, मिताली राज ५३, वेदा कृष्णमुर्ती २९; श्रीपाल वीराकोडी ३/२८, इनोका रणवीरा २/५५). श्रीलंका : ५० षटकात ७ बाद २१६ धावा (दिलानी मनोदरा ६१, शशिकला सिरिवर्दने ३७, निपुनी हंसिका २९; पुनम यादव २/२३, झुलन गोस्वामी २/२६, दीप्ती शर्मा १/४६.)