शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली

By admin | Published: June 12, 2017 1:48 PM

श्रीलंकेकडून झालेल्या पराभवापासून धडा घेत भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले.

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 12 - जिंकण्यासाठी अनेकदा तुम्हाला कटू बोलावं लागतं. ज्यामुळे तुमचे सहकारी दुखावले जातात. पण जी चूक झालीय ती मान्य करुन सुधारणा केली पाहिजे. त्यासाठीच लाखो लोकांमधून या स्तरावर खेळण्यासाठी तुमची निवड झाली आहे अशा शब्दात कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. 
 
श्रीलंकेकडून झालेल्या पराभवापासून धडा घेत भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले. पराभव झाल्यानंतर तुम्हाला परत उठून उभे राहावे लागते. सारख्या सारख्या त्याच त्याच चूका करुन चालत नाही. मी दोन-तीन खेळाडूंना सुधारणा करायला सांगत नाहीय. संघातील प्रत्येक खेळाडूने खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे आणि आज आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवली. आज आम्ही उत्कृष्ट सांघिक खेळ केला जो समाधान देणारा होता असे विराट म्हणाला. उपांत्यफेरीत भारताचा सामना गुरुवारी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. 
 
ज्या चूका झाल्यात त्या दाखवल्या पाहिजेत पण समोरचा खेळाडू दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण ते सर्व व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. संघातील खेळाडूंशी कसे बोलायचे, कशा पद्धतीने चर्चा करायची ते तुम्हाला समजले पाहिजे असे कोहली म्हणाला. या स्तरावर खेळताना आपण कशी कामगिरी केली पाहिजे हे प्रत्येक क्रिकेटपटूला ठाऊक असते असे कोहली म्हणाला. प्रत्येकवेळी शांत राहणे सोपे नसते हे त्याने कबूल केले. श्रीलंकेविरुद्धच्या मानसिक खच्चीकरण करणा-या पराभवानंतर संघाने जी कामगिरी करुन दाखवली त्यावर कर्णधार म्हणून कोहली आनंदी आहे. 
 
नाणेफेक जिंकणे चांगले राहिले. खेळपट्टी विशेष काही बदललेली नव्हती. फलंदाजीसाठी ती पोषक होती. आज आमचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले आणि त्यांना गोलंदाजांनीही पूर्ण साथ दिली. जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्हाला फायदा घ्यायला हवा. डिव्हिलियर्सला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरलो हे आमच्यासाठी चांगले होते. कारण तो तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो असे कोहली म्हणाला.