शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

खाऊचा चमचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 09:41 IST

ताटात, वाटीत नाही, तर चमचाभरच खा असं म्हणणारा एक इटुकला ट्रेण्ड. 

- भक्ती सोमण

लहान असताना आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा असं म्हणत आपल्याला भरवते. पुढं आपण स्वत:च्या हातानं, ताट-वाटी-चमच्यानंही जेऊ लागतो. भसाभसा वाढून घेतो, टाकायचं कसं म्हणून खातो. हॉटेलातही तेच. अनेकदा सगळ्या ग्रेव्ही सारख्याच. अनेकदा अन्न उरतं, वाया जातं. बुफेत वाया जाणाºया अन्नाविषयी बोलायलाच नको.पण हे चित्र आता पालटतंय.

अनेकांना वाटतंय की, अन्नाशी अशी नासाडी बरी नव्हे. काहीजण तर खाण्याविषयी फार कॉन्शस. त्यांना सतत वजनाचा काटा दिसतो. ते मोजून-मापून खातात. त्यावर आता अनेकजण भन्नाट प्रयोग करू लागलेत. त्याविषयी गेल्या काही महिन्यांपासून ऐकून होते; पण प्रत्यक्ष बघायला मिळालं ते एका पार्टीत.

त्या पार्टीला अर्धेअधिक पदार्थ हे खोलगट चमच्यातून दिले (सर्व्ह) जात होते. तिथे ५-६ प्रकारचे काउण्टर्स होते. एका काउण्टरवर पनीर, भाज्या मिक्स केलेला सॅलेडचा काउण्टर होता. तर एका काउण्टरवर छोट्या आकाराच्या ब्रेडवर तेवढाच छोटा बटाटेवडा होता. एक काउण्टरवर पास्ता होता, तर एकावर गुलाबजाम. असे हे सगळे पदार्थ हारीने आणि आकर्षक रंगसंगतीने त्या चमच्यात मांडले होते. हे खायचं कसं, हा प्रश्न साहजिकच पडला. म्हणून लोकांचं अनुकरण करून एक प्लेट घेतली त्यात आवडीप्रमाणे सॅलेडचा चमचा घेऊन तो घास खाल्ला. आवडलं म्हणून पुुन्हा घेतलं. मग असंच बाकीच्या पदार्थांचेही घास घेतले. त्या सगळ्याची चव अतिशय सुंदर होती. बरं, खाताना वाया जाणं हा प्रकारच नव्हता. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला तर लोकांना अशाप्रकारे खायला आवडतंय हे दिसून येत होतं. यासाठी लागणारा चमचा हा सुपासाठी लागणारा खोलगट रंगीबेरंगी किंवा आवडीप्रमाणे खोलगट पदार्थ ठेवता येईल असा असतो.

या घासभर खाण्याच्या आणि तेही बदलत्या ट्रेण्डविषयी सुप्रसिद्ध शेफ अमेय महाजनी म्हणाला, हा मुख्यत: युरोपियन ट्रेण्ड आहे; पण आता ग्लोबलायजेशन आणि इन्स्टाग्राममुळे लोकांना याविषयी आकर्षण निर्माण झालं आहे. असं म्हणतात की माणसाचं जेवण ९० टक्के डोळ्यांवर आणि १० टक्के चवीवर अवलंबून असतं. चमच्याने दिल्या जाणाºया पदार्थात रंगसंगती इतकी कलात्मक असते की ते पाहूनच खावेसे वाटतात. शिवाय चवही चांगलीच असते. तसंच एकावेळी खूप पदार्थ घेऊन ते वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला ज्या आकारात पदार्थ हवाय त्या आकारात तो चमच्यात एका घासात खाता येतो.

खाते पिते घर का आदमी दिसण्यासाठी भरपूर खाणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच अन्न वाया जाऊ नये हेदेखील महत्त्वाचं आहे. म्हणूनच पदार्थ चमच्यात देण्याचा ट्रेण्ड हा सध्या जाम चालतो आहे. हे वाचल्यावर असं वाटेलं की, पदार्थ एकदाच घ्यायचा का? तर तसं नाही. पदार्थ आवडला असेल तर पाहिजे तेवढ्या वेळा तो चमचा घेता येऊ शकतो बरं का..

(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)