शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

परभणी जिल्ह्यात ५ महिन्यांत २७८ बालविवाहांना लावला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 4:43 PM

सोळा प्रकरणांत गुन्हे दाखल; जनजागृतीची आवश्यकता

परभणी : बालविवाहाचे प्रमाण परभणी जिल्ह्यात ४८ टक्के असून, हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. 'बालविवाह मुक्त परभणी' या अभियानांतर्गत एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या ५ महिन्यांत जिल्ह्यातील २७८ बालविवाहांना ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. १६ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणखीही जनजागृतीची आवश्यकता आहे.

 बालविवाहाला प्रतिबंध व्हावा, यासाठी जिल्ह्यात मागील वर्षीपासून विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विविध कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा, लोकजागर अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. ३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची एकदिवसीय बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळा घेऊन उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, १२५ शाळा, धर्मगुरू, आचारी, मंडप डेकोरेशन पुरविणारे आदींना एकत्र करून विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली, तसेच जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे, प्रार्थनास्थळे, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाह मुक्त अभियानात १००० महिलांचा सहभाग असलेली रॅली काढून जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा केला. आकाशवाणी, एफएम, सजीव देखावे व विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात आली.

अभियानाचा आता दुसरा टप्पाबालविवाहमुक्त परभणी या अभियानांतर्गत आता दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने 'ट्रॅक द गर्ल चाइल्ड' या नावाने ॲप विकसित केले जात आहे. या ॲपद्वारे ० ते १८ वयोगटातील मुलींचे ट्रेकिंग केले जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर व शाळा स्तरावर माहिती घेऊन बालविवाह होऊ शकतो अशी शक्यता वाटल्यास त्या मुलींची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावणार आहेत. समाजाने १८ वर्षांपर्यंत शिक्षण देण्यासाठी या मुलींना दत्तक घ्यावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. या टप्प्यात समाजाचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे.

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहू द्या‘त्या’ २८ टक्क्यांचं काय ?मुलींच्या शिक्षणाबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईल अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. शाळा गावात असणे, नसेल तर शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था आणि मुलींची सुरक्षिततासुद्धा महत्त्वाची मानली जाते. आदी व्यवस्था झाली तर मुली शिक्षण घेऊ शकतात. म्हणूनच मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहू द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ७२ टक्के मुली दहावीपर्यंत शिक्षण घेतात उरलेल्या २८ टक्क्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परभणी पहिला जिल्हाएनएफएचएसच्या चौथ्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून, जिल्ह्यातील प्रमाणही सर्वाधिक म्हणजे ४८ टक्के आहे. महाराष्ट्रात बालविवाह मुक्तीची चळवळ सुरू करणारा परभणी पहिला जिल्हा आहे.

प्रभावीपणे राबविला जाणार'बालविवाहमुक्त परभणी' हा उपक्रम तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले अभियान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, महिला बालकल्याणचे विभागीय आयुक्त डॉ. प्रशांत ननावरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. उपक्रम पुढेही प्रभावीपणे राबविला जाणार असून, परभणी जिल्ह्यासारखेच अभियान बीड, नांदेड, सोलापूर आदी जिल्ह्यांत राबविले जात असल्याची माहिती के. व्ही. तिडके यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी