शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइनही स्वीकारण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:05 IST

मानवत तालुक्यातील वझूर बुद्रुक येथील नुकसानीची केली पाहणी  

मानवत (परभणी): ठाकरे गट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक शिवारातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पाहणी  केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कृषिमंत्री फक्त बाहेरून बाहेरून  महामार्गाच्या कडेने पाहणी करून नुकसान पाहणी दौरा आटपून घेत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच कृषिमंत्र्यांनी जमिनीवर उतरून नुकसानीची पाहणी करणे आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

एक आणि दोन सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक सोयाबीन तूर आधी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  या नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक येथे आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्यासह शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

सायंकाळी पाच वाजता  आदित्य ठाकरे यांचे वजुर बुद्रुक या गावात आगमन झाले. पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करत यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेताच्या नुकसानासह  घरातही पाणी घुसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आजच्या दौऱ्यावरून त्यांनी विचारणा केली असता  मुंडे आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषिमंत्र्यांनी  बाहेरून बाहेरून हायवेच्या कडेने शेतांची पाहणी केली. त्यांनी जमिनीवर उतरून पाहणी करावी अशी टीका, आदित्य ठाकरे यांनी केली. 

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कृषी विभागाला  शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइन देखील स्वीकारण्याची मागणी केली. वझुर (बु) नंतर रामेटाकळी शिवारातही ठाकरे यांनी नुकसानग्रस्त कापसाची पाहणी केली. दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीAditya Thackreyआदित्य ठाकरेRainपाऊस