शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:13 AM

जिंतूर- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला ...

जिंतूर- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे गावोगावी बेरोजगारांची संख्या आणखीनच वाढली असून त्यांच्यासमोर आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार सुशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात जवळपास ३० हजार सुशिक्षित युवक व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त देशातील महानगर, राज्य किंवा विदेशात गेले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना फटका बसला असून रोजगार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे गावाची वाट या नवतरुण युवकांना धरावी लागली. हा सर्व प्रकार खरीप हंगामाच्या सुरुवातीस झाल्याने काहींनी शेती करणे पसंत केले तर काही युवक बेरोजगार राहिले. त्यामुळे त्यांचा भार कुटुंबांना सोसावा लागला. तालुक्यात एकही मोठा उद्योग व्यवसाय आजघडीला सुरू नाही. औद्योगिक वसाहतीत परराज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध केला जात नाही. त्यात अनेक लघुउद्योग असले तरी स्थानिक मजुरांना मात्र रोजगार उपलब्ध केला जात नाही, अशी ओरड होत असते. तालुक्यात माजी राज्यमंत्री यांचा खत कारखाना तालुक्यातील अनेक युवकांसाठी रोजगाराचे केंद्र ठरला होता. परंतु, राजकीय धुळवडीमुळे मागील कित्येक वर्षांपासून तोही गंजून बंद पडला आहे. तर तालुक्यातील जवळपास १० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी आमदारांनी मोठा गाजावाजा करून साखर कारखान्याची पायाभरणी केली. परंतु, अजूनही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तालुक्यात मागील पन्नास वर्षांपासून राजकीय सत्तापालट होऊनही केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुक्यातील उद्योग व्यवसायास गती मिळालेली नाही. आजही अनेक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांचे काम थंडबस्त्यात आहे. निवडणूक आली की, राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, पूर्तता होत नसल्यामुळे जिंतूर तालुक्यात रोजगारनिर्मिती दिवास्वप्नच राहत आहे. त्यामुळे रखडलेले उद्योग-व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करावी किंवा लघुउद्योगासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी शासनदरबारी केली आहे.

दारू, गुटखा विक्रीकडे वळले तरुण

मोठ्या शहरात उद्योग व्यवसाय करणारे तरुण मागील सहा महिन्यापासून गावामध्ये परतले आहेत. गावाकडे हाताला काम न मिळाल्यामुळे अनेक तरुण अवैध मार्गाने दारू- गुटखा विक्रीकडे वळले असून त्यामधून रोजगार निर्माण करत आहेत. तालुक्यात उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे तरुण पिढी या वाम मार्गाकडे जात आहे.