श्रमश्री बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून गोविंद मोरे, सचिन खिल्लारे, शीतल ठाकूर, पांडुरंग गुंडे, श्रद्धा ठाकूर, कचरू शेळके, आदींनी शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून पीडित, शोषित, निराधारांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. या कामाची कक्षा वाढविली जात असून, त्याअंतर्गत परभणी-पाथरी रस्त्यावरील पेडगाव फाट्यावर आनंदभवन हा प्रकल्प उभा केला जात आहे. सध्या या प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. वंचित, दुर्बल आणि अनाथांच्या शिक्षण, पोषण, आहार आणि सर्वांगीण विकासासाठी प्रकल्पाची उभारणी केली जात आहे.
आनंदभवनच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल आणि अनाथ बांधवांना मदत करण्याच्या उद्देशाने आणि या वंचितांना मायेचा आधार देण्यासाठी हा प्रकल्प उभा केला जात आहे. सध्या ५० निराधार मुलांसाठी प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गोविंद मोरे यांनी दिली.