शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

मयत प्राध्यापकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:15 AM

गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून मयत प्राध्यापकाची नियुक्ती निवडणूक विभागाने करून २६ डिसेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षण ...

गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून मयत प्राध्यापकाची नियुक्ती निवडणूक विभागाने करून २६ डिसेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची नोटीसही या प्राध्यापकाच्या नावे काढली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग प्रशासनाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

गंगाखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामंपचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, अर्ज भरण्याचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्याअनुषंगाने निवडणूक विभागही कामाला लागला आहे. ग्रामपंचायत मतदान अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या स्वाक्षरीने काही प्राध्यापक व शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी शहरातील साई वृंदावन कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची नोटीसही काढण्यात आली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांच्या स्वाक्षरीने मयत प्राध्यापकाच्या नावे नोटीस काढण्यात आली. विशेष म्हणजे मतदान अधिकारी म्हणून निवडणूक प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला. प्राध्यापक हाश्मी सय्यद रफीक सय्यद तमीज यांचे २१ मार्च २०२० रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अद्ययावत याद्या शाळेतून मागविल्या नसल्याचे या प्रकारातून समोर येत आहे. १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक विभागाच्या या अजब कारभारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

...तर घडला नसता प्रकार

तालुक्यातील शाळांतून निवडणूक विभागाला शिक्षकांच्या याद्या मागविताना मुख्याध्यापक, शिक्षकांचे नाव, पदनाम, बेसिक पगार, जन्मतारीख नेमणूक तारीख आणि सेवानिवृत्तीचा दिनांक अशी परिपूर्ण माहिती दिली जाते. या यादीतील निवृत्ती होणाऱ्या शिक्षकांची नावे न पाहताच निवडणूक कामावर हजर राहण्याची नोटीस या विभागाकडून पाठविली जात आहे. निवडणूक कामासाठी असणारे कर्मचारी पारदर्शकता न ठेवता सरळ तहसीलदारांच्या स्वाक्षरीने नोटीस पाठवत आहेत. शाळेतून आलेल्या प्रत्येक यादीची छाननी करून निवडणूक मतदान अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली असती तर हा प्रकार घडला नसता, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.