शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:17 IST

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाचे वाहन आणि कंटेनरचा झाला भीषण अपघात

वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश वाहुळकर यांचा २२ मे रोजी दुपारी १ वाजेदरम्यान पश्चिम बंगालमधील बिनागोडी येथून कठिहाल येथे जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला. ही बातमी गुंज येथे कळताच गावावर शोककळा पसरली आहे. 

वसमत तालुक्यातील गुंज येथील अंकुश वाहुळकर हे पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होते. २२ मे रोजी बिनागोडी येथून कठिहालकडे जाणाऱ्या सैन्य दलाच्या वाहनातून ते कर्तव्य बजाविण्यासाठी जात होते. त्यांच्या सोबत इतर सैनिकही होते.  यावेळी गुलाबाह जवळ एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्याचे वाहन आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात जवान अंकुश वाहुळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गुंज गावासह वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जवान अंकुश वाहुळकर हे डिसेंबर २०२० मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. वीरमरण आलेल्या या जवानावर गुंज येथे २४ मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माझा काळजाचा तुकडा काळाने नेला...अंकुशला लहानपणापासून देशाबद्दल प्रेम होते. शाळेत असतानाच मी मिल्ट्रीमध्ये जाणार, देशाची सेवा करणार असे म्हणायचा. गुरुजणांनी शाळेत दिलेला गृहपाठ रोजच्या रोज पूर्ण करायचा. गृहपाठ पूर्ण करत मित्रांना म्हणायचा आपण मोठेपणी सैन्यात जावू, देशाची सेवा करु, मला देशाची सेवा करण्याची खूप इच्छा आहे,असे तो म्हणत असे. माझ्या लेकराची सैन्यात जाण्याची इच्छा देवाने पूर्ण केली. परंतु काळाने माझा काळजाचा तुकडा माझ्यापासून कायमचा हिरावून घेतला आहे. - राणीबाई एकनाथ वाहुळकर (वीर जवान अंकुशची आई)

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानparabhaniपरभणीAccidentअपघातMartyrशहीद