शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बी.रघुनाथ हे मराठी मातीचे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:23 AM

परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे ...

परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे म्हणूनच बी.रघुनाथ हे केवळ परभणीचेच नव्हे तर मराठी मातीचे वैभव आहेत, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

थोर साहित्यीक कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी म.न.पा. आयुक्त देविदास पवार, पत्रकार आसाराम लोमटे, मसापचे रमाकांत कुलकर्णी, सरोजताई देशपांडे, प्रा. अशोक जोंधळे, उदय वाईकर, नागेश कुलकर्णी, दिनकर देशपांडे, अरुण चव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. भालेराव म्हणाले, बी. रघुनाथ यांचा स्मृती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो, ही अभिनंदनीय बाब आहे. आयुक्त देविदास पवार यांनी प्रास्ताविक केले.

ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी नवीन वाचकांना व संशोधकांना निजामकालीन मराठवाडा व त्या काळच्या लेखाजोखा अभ्यासण्यासाठी बी. रघुनाथांचे साहित्य फार मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. अशोक जोंधळे यांनी ‘सांज’ ह्या कवितेचे भावपूर्ण सादरीकरण केले. उदय वाईकर यांनी ‘आज कुणाला गावे’ ही कविता सादर केली. तर ‘निळावंतीची लावणी’ ह्या कथेचे नागेश कुलकर्णी यांनी नाट्यअभिवाचन केले. तसेच "ते न तिने कधी ओळखले" कविता दिनकर देशपांडे यांनी सादर केली. बालराज्यनाट्य स्पर्धेतील गुणी कलाकार कु.श्रीया लव्हेकर हिचा सत्कार करण्यात आला. राजकुमार जाधव यांनी उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमोद बल्लाळ, संजय पांडे, रामेश्वर कुलकर्णी, किशन पैके, कैलास काकडे, भगवान पावडे, नगरसचिव विकास रत्नपारखी व युवराज साबळे आदींनी प्रयत्न केले.

पुष्पा बनसोडे व ईखतियार पठाण यांनी सूत्रसंचालन केले.