कार्यक्रमास बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दि.फ.लोंढे, नवनिर्वाचित सरपंच दीक्षा पैैठणे, उपसरपंच तानाजी कदम, नवनाथ पैठणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दि.फ. लोंढे म्हणाले, बार्टी समतादूत हे समाज संस्काराचे धन आहेत. कुटुंबात दुय्यम स्थान असलेल्या स्त्रीला संविधानाने पुरुषांच्या बरोबरीने स्थान प्राप्त करून दिले आहे. महिलांना सन्मान मिळवून देण्याचे काम करण्यात आले आहे. त्यातूनच ग्रामपंचायतीपासून ते समाजातील विविध क्षेत्रांत महिला उल्लेखनीय काम करीत आहेत.
कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच यांच्यासह उपस्थित मान्यवरांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्णा तालुक्याचे समतादूत महादेव तुरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बार्टीच्या वतीने गौरव प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी कैलास जाधव, मंचकराव बैलवाडे, नितीन कदम, सिद्धेश्वर कदम, अभय भराडे, अजय रणखांबे, रामा गायकवाड, बालासाहेब कदम, आनंद पैठणे, अजय तुपसमुद्रे, आर.एन. ढाकरगे आदींनी प्रयत्न केेले.
कार्यक्रमास धर्मापुरी येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.