शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

किसान संघर्ष समितीचा ताफा दिल्लीत धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:17 AM

शेतकरी विरोधी कायद्यांच्या माध्यमातून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कार्पोरेट मित्रांना मुनाफेखोरी करण्यासाठी आणि जागतिक व्यापार संघटनेला दिलेला ...

शेतकरी विरोधी कायद्यांच्या माध्यमातून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कार्पोरेट मित्रांना मुनाफेखोरी करण्यासाठी आणि जागतिक व्यापार संघटनेला दिलेला शब्द पाळण्यासाठी देशातील भूमिपुत्रांशी द्रोह करण्याचे काम करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. शेतीचा धंदाच आतबट्ट्याचा झाल्यामुळे सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात घडल्या आहेत. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याचे जीवन नेहमीच असुरक्षित आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात २९% क्षेत्रावर लागवड असलेल्या कापूस पिकाच्या खरेदीसाठी केंद्र शासनाच्या नव्या कायद्यामुळे सीसीआय व नाफेड या सरकारी संस्थांनी खरेदी केंद्रेच पुरेश्या प्रमाणात उघडली नाहीत आणि कापूस खरेदीमधून अंग काढून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. प्रस्तावित वीज कायद्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढच करण्यात येत आहे. त्यामुळे दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान संघर्ष सभेेने काढलेल्या संघर्ष यात्रांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८ डिसेंबर रोजीच्या बंदला तमाम जनतेने आणि विशेषतः ग्रामीण भागातील प्रतिसाद दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीकविमा योजनेत गतवर्षी ८७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाल्याचे सांगितले. ही बाब खोटी व दिशाभूल करणारी आहे. शेतकरी विरोधी कायद्या विरुद्ध लढ्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढविण्यासाठी विविध विचारसरणीच्या शेतकरी संघटना एकत्रित लढा देत आहेत. भाकप प्रणीत किसान सभा, सत्यशोधक किसान सभा, शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कष्टकरी संघर्ष समिती, मानव मुक्ती मिशन, जात्यंतक शेतकरी सभा, संभाजी ब्रिगेड यासह अनेक संघटनांचे सुमारे २५ जिल्ह्यातील ५ हजार शेतकरी या लढ्यात सहभागी होत आहेत. मराठवाडा किसान संघर्ष जत्था २ जानेवारी रोजी गंगाखेड येथून दिल्लीकडे रवाना होत आहे. यावेळी गंगाखेड येथे आयोजित जाहीर सभेस कॉ.नामदेव गावडे संबोधित करणार आहेत. बाळ चौधरी हे स्वागताध्यक्ष आहेत. परभणी जिल्ह्यातून शेकडो शेतकरी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होत आहेत. कॉ.राजन क्षीरसागर, माणिक कदम, कैलास येसगे, शिवाजी कदम, नितीन सावंत आदी मराठवाड्यातून निघणाऱ्या किसान संघर्ष जत्थाचे नेतृत्व करणार आहेत.