शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

कोरोना रुग्णांचा जेवणावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:17 AM

जिंतूर : येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता नसल्याने रुग्णांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत सोमवारपासून जेवणावर बहिष्कार ...

जिंतूर : येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता नसल्याने रुग्णांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत सोमवारपासून जेवणावर बहिष्कार टाकला आहे. जिंतूर शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सद्य:स्थितीला ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, या रुग्णांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. निकृष्ट जेवणाबरोबरच अवेळी जेवण मिळत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे सकाळचा नाष्टा, चहा आणि वेळेवर जेवण मिळत नाही. जे काही देण्यात येत आहे ते निकृष्ट व दर्जाहीन असल्याने अनेकांनी जेवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपासमोरीची वेळ आली आहे. सोमवारपासून या सर्व रुग्णांनी एकत्र येत जेवणावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे जेवण मिळत नसताना दुसरीकडे स्वच्छतेचाही अभाव दिसून येत आहे. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कोरेाना रुग्णांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत

जिंतूरच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असताना प्रशासन मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जेवणाची सर्व व्यवस्था महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. परंतु, नेमकी याची जबाबदारी घ्यायची कोणी? या बाबतीत एकमत नाही. याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांनी एकत्र येत जेवणावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने या संदर्भात पावले उचलली नाही तर आम्ही क्वारंटाईन सेंटर सोडून जाऊ असे अनेक रुग्णांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.