शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

अंकुरलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:13 AM

सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, ...

सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, रानडुक्कर,वानरे या वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. देवगांवफाटा शिवारात तर रोही, नीलगाय व हरिणांच्या कळपाच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे राहिले आहे. हे वन्यप्राणी समूहाने शेतात फिरत असून सकाळ, संध्याकाळ शेतात कोणी नसताना ते कोवळी पिके फस्त करीत आहेत. या वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

वनविभाग प्रशासन झोपेतच

मागील वर्षात सेलू तालुक्यात शेतकरी मशागतीची कामे करतांना जवळपास १२ शेतकऱ्यांवर रानडुक्कराने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यापैकी चिकलठाणा बु.शिवारातील एका शेतकऱ्यांचा एक पाय कापावा लागला. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या या शेतकऱ्याला अपंगत्व आले असे असतानाही वनविभाग प्रशासनाकडून याची ना दखल घेतली गेली. यामुळे वनविभाग प्रशासनाची कुंभकर्ण झोप कधी संपते, अशी मार्मिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

खरीप पेरणी नंतर अंकुरलेल्या पिकांची हरीण, रोही या वन्यप्राणी नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतात रात्री बराच वेळ थांबून सकाळी लवकर शेतात येणे असा दिनक्रम चालू आहे. विशेषतः हा वन्यप्राणीचा कळप एका शेतकऱ्यांना ऐकत नाही. फटाक्यांचे आवाज करून तर कधी तीन-चार शेतकरी एकत्र येऊन या वन्यप्राण्यांना काढून द्यावे, लागत आहे.

सूर्यकांत होणराव, शेतकरी, देवगांवफाटा