शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

१० हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात ...

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २८ डिसेंबरपर्यंत बँकांच्या उदासीन भूमिकेमुळे केवळ ९ हजार ८६१ शेतकऱ्यांनाच ५३ कोटी ४२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या रबी हंगामात तरी पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामातून हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. रबी पेरणीचा हंगाम पूर्ण झाला आहे. मात्र, २८ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ८६१ शेतकऱ्यांना ५३ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बँकांना दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खाजगी बँकांचा आखडता हात

यावर्षीच्या रबी हंगामात जवळपास १० हजार शेतकऱ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये खाजगी बँकांनी १८५ शेतकऱ्यांना २ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार १३२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५१ लाख, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३ हजार ४२१ शेतकऱ्यांना १५ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ दिला आहे, तर दुसरीकडे व्यावसायिक बँकांनी २ हजार १२३ शेतकऱ्यांना १५ कोटी ९९ लाख रुपयांचा लाभ दिला आहे.