शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:23 AM

पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी ...

पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, तसेच पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारदेखील जडतात.

दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.

याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

आजाराची लक्षणे

पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.

उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.

सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.

लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे

पाणी उकळून प्यायलेले बरे

पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर पिंपात भरून ठेवल्यास ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

१० दिवसांतून एक वेळ परभणीकरांना पाणी

परभणीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

शहराला सध्या १० दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. जुन्या पाईपलाईनमधूनही पाणीपुरवठा सुरू आहे. या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अधिक काळजीची गरज आहे.