शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

ग्रामीण भागात सेवा बंधनकारक केल्याने ६८ डॉक्टर दोन महिन्यांपूर्वी नव्याने रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:13 AM

ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी पुढे येत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची ...

ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी पुढे येत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त होती. नव्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची भरती केली असून, त्यांना ग्रामीण भागात सेवा करणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या या धोरणामुळे जिल्ह्याला ६८ एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले. ते सर्व रुजू झाले आहेत. आणखी चार वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जेवढ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश काढण्यात आले. ते सर्व रुजू झाले आहेत.

चार रिक्त जागा

जिल्ह्यात नवीन ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ६ आरोग्य केंद्रांची नव्याने निर्मिती झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती; परंतु दोन महिन्यांपूर्वी ६८ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश झाले असून, हे सर्व वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चार जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करून आरोग्य सेवा चालविली जात असे. पदभरती करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला. कोरोनाच्या संसर्ग काळात नवीन पदभरती झाली असून, त्यात ग्रामीण भागासाठीही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनंतर ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात नव्याने सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारतही बांधून पूर्ण झाली. मात्र, पदांना मंजुरी नसल्याने येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होती. दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नव्याने स्थापन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा हा प्रश्नही सुटला आहे.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाने नियुक्ती दिली असून त्यांना ग्रामीण भागात सेवा बंधनकारक केली आहे. त्यामुळे नियुक्ती मिळालेले सर्व वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती केली होती. आता एम.बी.बी.एस. डॉक्टर्स मिळाले आहेत.

- डॉ. एस.पी. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी

अनेक विद्यार्थ्यांचे एम.बी.बी.एस. पुढील शिक्षण अपूर्ण असते. ते पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाते.

ग्रामीण भागात निवास व इतर सुविधा मिळत नाहीत. शहरी भागात शिक्षण झाल्याने ग्रामीण भागात जाण्यास टाळाटाळ होते.