शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मागील वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या समस्यांना वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकी १७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : मागील वर्षभरात ६४ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतीच्या समस्यांना वैतागून मृत्यूला कवटाळले. त्यापैकी १७ शेतकऱ्यांना शासकीय मदत नाकारण्यात आली असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे.

शेती निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस अधिक झाला तरी नुकसान आणि पावसाने पाठ फिरवली तरीही नुकसान. त्यामुळे या व्यवसायात नुकसान अधिक आणि नफा कमी, अशी परिस्थती मागील काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेवर पेरणी करायची, घरातील पैसा जमवून शेतीत गुंतवणूक करायची. सुरुवातीचे काही दिवस पीक जोमात येते. परंतु, एकाच संकटात होत्याचे नव्हते होते आणि नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे वारंवार होणारी नापिकी, त्यातून बँकांकडील कर्जाचा वाढलेला डोंगर या चिंतेने ग्रासलेल्या अनेक शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे.

मागील वर्षात कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. या नव्या संकटाने जिल्हावासीय भयभीत असले तरी शेतीसमाेरील समस्या संपलेल्या नव्हत्या. या काळातही जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून खातरजमा करण्यात आली. त्यामध्ये ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषाला पात्र ठरल्याने या शेतकरी कुटुंबियांना प्रतिकुटूंब १ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, दुसरीकडे १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविल्या आहेत. त्यामुळे हे शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत. दोन प्रकरणांमध्ये अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही. शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबियांचे मोठे हाल होतात. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद होऊन मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा अनेक समस्या समोर उभ्या राहतात. अशाही परिस्थितीत धीर धरत अनेक कुटुंबियांनी स्वत:ला सावरले आहे.

तीन महिन्यात १८ प्रकरणे

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मागील वर्षी १२ महिन्यांमध्ये ६४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. मात्र, यावर्षीच्या अडीच महिन्यांतच १८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

आत्महत्या केलेल्या या प्रकरणांपैकी ५ प्रकरणे पात्र ठरली असून, १३ प्रकरणांची प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्येची ६ प्रकरणे झाली होती. त्यापैकी ४ प्रकरणे पात्र ठरली असून, २ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात ४ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यातील १ प्रकरण पात्र ठरले असून, ३ प्रकरणात चौकशी सुरू आहे. तर १ ते १४ मार्च या काळात ८ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यांची चौकशी सुरू आहे.