शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

सचिवांच्या आदेशानंतरही अतिक्रमण हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:22 AM

शहरातील जिंतूर रोड भागातील ईदगाह मैदानावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातून आर्थिक वसुली केली जात आहे. त्यामुळे ...

शहरातील जिंतूर रोड भागातील ईदगाह मैदानावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातून आर्थिक वसुली केली जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांकडे शहरातील काही नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सचिवांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना १ ऑक्टोबर रोजी पत्र पाठविले आहे. त्यात परभणी शहरातील ईदगाह मैदानावरील अतिक्रमण हटविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. तसेच या प्रकरणी कार्यवाही न करता जाणीवपूर्वक वेळकाढूपणा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यास्तव सदरील प्रकरणी आपल्या स्तरावरून कार्यवाही करून त्याबाबत संबंधितास अवगत करावे, असेही या पत्रात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सचिव एस. सी. तडवी यांनी म्हटले आहे. हे पत्र येऊन जवळपास ३ महिन्यांचा कालावधी होत आला तरी याप्रकरणी कसल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वक्फ बोर्डाच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाचे एवढी उदासीनता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.