शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
4
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
5
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
6
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
7
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
9
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
10
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
11
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
12
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
13
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
14
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
15
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
16
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
18
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
19
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
20
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

२३ पाणवठ्यावरून वनविभागाने टिपले ५४२ वन्यप्राणी

By मारोती जुंबडे | Published: May 25, 2024 4:57 PM

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे.

परभणी: येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशूगणनेत २३ पानवठ्यावरून ५४२ वन्यप्राणी टिपल्याची नोंद वन विभागाकडे करण्यात आली आहे. या अहवालात सर्वाधिक हरीण आढळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परभणी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वनसंपदेच्या संवर्धना बरोबरच रक्षणाचे काम केले जाते. पशुगणना ही या कार्यालयाच्या कामकाजाचा एक भाग आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पशु गणना होते. या गणनेत पशुंच्या संख्येनुसार संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजनांचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे दरवर्षी वन विभागाकडून पशु गणना केली जाते. यंदा २२ ते २४ मे दरम्यान बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणस्थळावरील वन्यप्राणी प्रगणना करून वन विभागाला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिंतूर व परभणी तालुक्यातील २३ पानवठ्यावर ५४२ वन्यप्राणी पशु गणनेत टिपल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मोर, ससा, हरिण, नीलगाय, रानडुक्कर आदींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

इटोली, जिंतूर बिटात सर्वाधिक पशू

वन विभागाने केलेल्या गणनेमध्ये जिंतूर आणि ईटोली या बीटामध्ये पशूंची संख्या अधिक असल्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये जिंतूर येथील बिटात कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, मोर असे एकूण १३६ वन्यप्राणी आढळले. तर केहाळ येथील एका पाणवठ्यावर मोर, ससा असे एकूण १२ प्राणी आढळले. त्याचबरोबर भोगाव येथे मोर, वानर, ससा, रानडुक्कर असे एकूण ४४ प्राणी दिसून आले. त्याचबरोबर ईटोली येथील पाच कृत्रिम पाणवठ्यावर वानर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, मोर असे एकूण ८६ पशु वनविभागाच्या गणनेत दिसून आले. त्याचबरोबर दाभा येथील दोन कृत्रिम पाणवठ्यावर एकूण ३३ वानर, नीलगाय, डुक्कर, कोल्हा, हरिण पशुपक्षी आढळल्याची नोंद करण्यात आली आहे.

आठ तालुक्यात वन्यप्राणी नाहीत का?

परभणी येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत जिंतूर तालुक्यातील केहाळ, जिंतूर, भोगाव, इटोली, दाभा, गारखेडा, सावरगाव, चौधरणी, वडाळी, आडगाव, मोहखेड येथील पाणवाठ्यावरच पशूंची गणना करण्यात आली. यामध्ये ४९७ पशुपक्षी आढळून आले. त्यामुळे वनविभागाने केवळ एकाच तालुक्यात पशूंची गणना केली आहे का? नसेल तर परभणीसह इतर आठ तालुक्यांमध्ये एकही कोल्हा, काळवीट, ससा, मोर, वानर वास्तव्यास नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.