शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
3
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
4
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
5
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
6
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)
7
'तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली...', 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांची खास पोस्ट
8
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
9
ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला
10
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
11
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
12
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
13
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
14
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
15
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
16
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
17
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
18
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
20
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचानामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:24 AM

जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी ...

जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य शासनाला तातडीने सादर करावा, तसेच मागील १५ दिवसांपूर्वी जी अतिवृष्टी झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती मोबाइल ॲपद्वारे रिलायन्स या जिल्ह्यासाठीच्या विमा कंपनीला देण्याचा प्रयत्न केला; परंतु अतिवृष्टीमुळे नेटवर्क जाम असल्याने, तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी एकदाच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने सदरील कंपनीचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविताना अडचणी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज ऑफलाइन घेण्यात यावेत, तसेच ज्या महसूल मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन पंचनामे करावेत. अतिवृष्टमुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, तसेच जनावरे दगावली आहेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच रस्त्यांचे नुकसान, विजेचे खांब पडणे याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री मलिक यांनी दिले आहेत. मंत्रालयातील बैठकीस आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार विजय भांबळे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिप सीईओ शिवानंद टाकसाळे, कृषी, बांधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.