शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:23 AM

परभणी : दोन दिवसांपासून जिल्ह्यांत संततधार पाऊस होत असून, या पावसाने हाहाकार उडविला आहे. पालम तालुक्यातील बनवस येथील १०० ...

परभणी : दोन दिवसांपासून जिल्ह्यांत संततधार पाऊस होत असून, या पावसाने हाहाकार उडविला आहे. पालम तालुक्यातील बनवस येथील १०० घरात पुराचे पाणी शिरले असून, पालम, गंगाखेड, सेलू, जिंतूर या तालुक्यातील अनेक मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद पडले आहेत. शेत जमिनीत पाणी साचून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात या वर्षी दमदार पाऊस होत आहे. दोन दिवसांपासून तर संततधार वृष्टी सुरू असून, प्रकल्प तुडुंब झाल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे पालम तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.

बनवसमध्ये १०० घरांत शिरले पाणी

पालम : तालुक्यातील बनवस येथे पुराच्या पाण्याने हलकल्लोळ माजविला आहे. पुराचे पाणी गावात शिरले असून, १०० घरे पाण्याखाली आहेत, तसेच या गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, घरासमोरील मोटारसायकल वाहून गेल्या आहेत.

बनवस गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या उसाव्याचे पाणी गावात शिरल्याने, अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. अनेक कुटुंबांत दुपारपासून चुली पेटल्या नाहीत.

पालम-ताडकळ महामार्ग बंद

पालम : गोदावरी नदीवरील धानोरा काळे येथील पूल पाण्याखाली गेला असून, पालम-पूर्णा या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

गोदावरी नदीला रात्रीपासून पूर आला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी ३६४.७० मीटर एवढी होती. त्यामुळे धानोरा काळे पुलावरून पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने वाहने अडकली आहेत. पाणी लवकर उतरण्याची शक्यता नसल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुराच्या पाण्यात अडकली बस

पालम : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम रस्त्यावर केरवाडी गावालगत घडली. जेसीबीच्या साहाय्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. केरवाडी गावालगत गळाटी नदीच्या पुलावरून पाणी वहात आहे. पालमकडून येणाऱ्या बस चालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. बसमध्ये १६ प्रवासी होते.