शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
4
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
5
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
6
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
7
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
8
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
9
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
10
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
11
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
12
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
13
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
14
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
15
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
16
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
17
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
18
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
19
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
20
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार

रब्बीच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:17 AM

लघू विक्रेत्यांना नुकसानीची झळ परभणी : जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे लघू विक्रेत्यांना आर्थिक झळ ...

लघू विक्रेत्यांना नुकसानीची झळ

परभणी : जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे लघू विक्रेत्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. तीन आठवड्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न या विक्रेत्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्हा प्रशासनाने विक्रेत्यांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

जलवाहिनीचे काम शहरात गतीने

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानात उभारलेल्या जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू आहे. येथील वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात सध्या हा व्हॉल्व्ह बसविला जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले आहे.

उन्हामुळे वाढली झाडांची पानगळ

परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, झाडांची पानगळ होत आहे. रस्त्याच्या कडेने असणारी हिरवी झाडे आतापर्यंत पाना-फुलांनी बहरलेली होती. मात्र, आता या झाडांची पानगळ होत असल्याने, वातावरणात भकासपणा निर्माण झाला आहे. पानगळ झाल्याने झाडांची सावलीही शिल्लक राहिलेली नाही.

नो-पार्किंगमध्ये उभी राहतात वाहने

परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात नो-पार्किंग झोन असताना, अनेक वाहनधारक बिनधास्तपणे या भागात वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे अडथळे पार करून रेल्वे स्थानक गाठावे लागते. अनेक प्रवाशांना वेळेत स्थानकात पोहोचणेही अवघड होत आहे.

खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

परभणी : शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. खड्डे चुकवितच वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या ठप्प आहेत. आता तर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या कामांना कधी मुहूर्त लागतो, असा सवाल उपस्थित होत आहे.

जि.प. इमारतीचे काम संथगतीने

परभणी : शहरातील जिल्हा परिषदेचे इमारत बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. अंतर्गत कामे मात्र संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे जि.प. कार्यालयाचे नवीन इमारतीत होणारे स्थलांतर लांबणीवर पडत आहे. सध्या शहरातील विविध भागांत जिल्हा परिषदेच्या कार्यालयांचे काम चालते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरावे लागत आहे.

कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

परभणी : जिल्ह्यात या वर्षी पाच साखर कारखाने सुरू झाले आहेत. आतापर्यंत कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले असून, आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाने समोर ठेवले आहे.