शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

आयसीएमआरच्या पथकाने ५०० जणांचे घेतले रक्तजल नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:14 AM

जिल्ह्यात चौथा सर्व्हे देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाचे नियंत्रण केले जात असतानाच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने कोरोनाचा ...

जिल्ह्यात चौथा सर्व्हे

देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाचे नियंत्रण केले जात असतानाच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने कोरोनाचा प्रतिकार करण्याची शक्ती कशा पद्धतीने वाढत आहे, याच्या प्रमाणाचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी देशभरात रँडम पद्धतीने गावांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांची या सर्वेक्षणासाठी निवड झाली असून, त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. आयसीएमआरच्या पथकाने आतापर्यंत तीन सर्व्हे केले आहेत. २३ जून रोजी चौथा सर्व्हे पूर्ण करण्यात आला.

१२० मुलांचे घेतले नमुने

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पथकाने जिल्ह्यातील १२० मुलांचे रक्तजल नमुने घेतले आहेत. १२ ते १७ वर्षे वयोगटातील ८० मुलांचे आणि ६ ते ९ वर्षे वयोगटातील ४० मुलांचे नमुने घेण्यात आले. त्याचप्रमाणे २८० नागरिकांचे, त्याचप्रमाणे १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे रक्तजल नमुने घेण्यात आले.