शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

अरुंद रस्त्यांवर जड वाहनांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:16 AM

बांधकाम साहित्याचा अडथळा वाढला परभणी : शहरात ठिकठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा ...

बांधकाम साहित्याचा अडथळा वाढला

परभणी : शहरात ठिकठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या साहित्यामुळे वाहनांना किरकोळ अपघातही होत आहेत. रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या नागरिकांवर मनपा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सार्वजनिक हातपंप बंद अवस्थेत

परभणी : शहरातील विविध प्रभागातील सार्वजनिक हातपंप बंद अवस्थेत आहेत. जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, या हातपंपांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हातपंपांना पुरेसे पाणी असतानाही केवळ हातपंपाचे साहित्य नसल्याने हे हातपंप बंद आहेत. हे सार्वजनिक हातपंप दुरुस्त केल्यास नागरिकांना उन्हाळ्यातील टंचाईपासून दिलासा मिळू शकतो.

प्रशासनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे नियम प्रशासनाने घालून दिले आहेत. मात्र, अनेक नागरिक या नियमांचे पालन करत नाहीत. स्थानिक संस्थांकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही हा प्रकार कमी होत नाही. तेव्हा मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना लावला जाणारा दंड वाढवावा, अशी मागणी होत आहे.

नारायणचाळ रस्त्याची दुरवस्था

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपासून नारायणचाळीत जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, आधीच हा रस्ता अरुंद असून, त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खड्ड्यांची भर पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.

ज्वारीच्या काढणीला सुरुवात

परभणी : रबी हंगामातील ज्वारीचे पीक काढणीला आले असून, ग्रामीण भागात या कामांना वेग आला आहे. या वर्षी जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यातच वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. सध्या काढणीचे काम गतीने सुरू आहे.

शहरातील पोलीस चौकी बंद

परभणी : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकी मागील काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. पोलीस चौकी सुरू केल्यास शहरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा बसू शकेल. त्याचप्रमाणे, नागरिकांना तक्रारी करण्यासाठीही दूर अंतरावर जाण्याऐवजी चौकी सोयीचे ठरणार आहे.

बस स्थानकावर तपासणीला खो

परभणी : येथील बस स्थानकावर नागरिकांची तपासणी होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकांच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले असताना, त्याकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.