शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:17 AM

परभणी : ऊसतोडीच्या पैशांच्या कारणावरुन अपहरण केलेल्या एका व्यक्तीचा आरोपींनी खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली असून, ग्रामीण पोलिसांनी ...

परभणी : ऊसतोडीच्या पैशांच्या कारणावरुन अपहरण केलेल्या एका व्यक्तीचा आरोपींनी खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली असून, ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

परभणी तालुक्यातील गव्हा येथील उत्तम नागोराव खरात हे ऊसतोडीसाठी कामाला गेले होते. त्यांनी काही रक्कम उचल म्हणून घेतली, त्यानंतर काही दिवसांपासून ते कामावर गेले नव्हते. याच दरम्यान १५ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना ऊसतोडीसाठी कामावर चल असे म्हणून आरोपींनी बळजबरीने उचलून नेले. या प्रकरणी उत्तम खरात यांचा मुलगा अक्षय खरात याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गजानन चांदू काळे (रा.साळपुरी तांडा), उत्तम गोरखनाथ काळे (रा.गव्हा) व इतर तिघांनी वडिलांना जबरदस्ती करुन पळवून नेल्याचे म्हटले. त्यावरुन आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

याच दरम्यान १८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एक मृतदेह वाहून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवा मोंढा पोलिसांनी या मृतदेहाचा पंचनामा करुन ओळख पटविण्याचे काम सुरू केले. तेव्हा हा मृतदेह उत्तम खरात यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटविली. तसेच अपहरण प्रकरणाच्या तपासाला गती दिली. त्यावेळी अपहरणकर्त्यांनीच उत्तम नागोराव खरात यांचा खून केल्याची बाब तपासात स्पष्ट झाली. दरम्यान, गजानन काळे आणि उत्तम काळे या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे, अशी माहिती गणेश राहिरे यांनी दिली.