शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

२३ मंडळांतील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:22 AM

खरीप हंगाम २०२१- २२ मध्ये जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर ...

खरीप हंगाम २०२१- २२ मध्ये जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली आहे. जूनमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांची पिके चांगलीच बहरली. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोयाबीन पिकाच्या पीक परिस्थितीचा अहवाल, पर्जन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचा अहवाल, दुष्काळसदृश परिस्थिती या आधारे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा कमी आहे. असे जिल्ह्यातील २३ महसूल मंडळांत निदर्शनास आल्यामुळे नुकसानभरपाई पात्र असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला आदेशित करण्यात आले आहे. ही रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून विहित मुदतीत संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ पैकी केवळ २३ मंडळांतील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार आहे.

५ टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्वेक्षण

सोयाबीन पेरणी क्षेत्राच्या ५ टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्वेक्षण करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये संबंधित मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी प्रतिनिधी या समितीचे सदस्य आहेत. या समितीकडून शुक्रवारपर्यंत बाधित क्षेत्राची पाहणी करून अहवाल सादर करावा, दिरंगाई करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले होते. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ५ टक्के क्षेत्राचा नजर अंदाज सर्वेक्षण अहवाल कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली.

या मंडळांचा समावेश

परभणी तालुक्यातील झरी, जांब, परभणी, गंगाखेड तालुक्यातील माखणी, राणीसावरगाव, गंगाखेड, पाथरी तालुक्यांतील बाभळगाव, हादगाव, कासापुरी, पाथरी, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बोरी, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर, पालम तालुक्यांतील चाटोरी, बनवस, पालम, सेलू तालुक्यातील वालुर, मोरेगाव, देऊळगाव गात, कुपटा, सोनपेठ तालुक्यातील वडगाव व मानवत तालुक्यातील मानवत या २३ मंडळांचा सोयाबीन पिकाच्या अग्रीमसाठी समावेश झाला आहे.