शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

परभणी : ६५ कृषीपंपांची तोडली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:08 IST

गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (प२भणी) : गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे.पाथरी तालुक्यात यावर्षी पावसाने खंड दिल्याने सरासरीच्या तुलनेत केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या तालुक्यात गंभीर दुष्काळही जाहीर केला आहे. तालुक्यातील जलसाठे, मध्यम लघु तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून या पाण्याचा अवैध उपसा रोखण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय दोन पथकेही स्थापन करण्यात आली असून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात महसूल, महावितरण आणि जायकवाडीतील अधिकाºयांचा समावेश आहे.१७ नोव्हेंबर रोजी गोदावरी पात्रात सुरु असलेल्या ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करुन मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नायब तहसीलदार ए.एन. नवगिरे, जायकवाडीचे शाखा अभियंता एम.बी. कलशेट्टी, महावितरणचे अभियंता सुनील चौरे, नितेश रायपुरे, मंडळ अधिकारी जे.डी. बिडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे कृषीपंपधारकांचे धाबे दणाणले आहेत.ढालेगाव, रामपुरीयेथे कारवाईगोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव कार्यक्षेत्रात रामपुरी येथील ५ विद्युत रोहित्रांवरील ४० कृषीपंप आणि ढालेगाव येथील दोन विद्युत रोहित्रांवरील १५ कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. झरी येथील तलावात मात्र एकही कृषीपंप आढळला नाही....तर जप्तीची कारवाईपाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजवाणी करण्यासाठी गोदाकाठच्या भागात अवैध पाणीउपसा रोखला जात आहे. गोदावरी काठावरील सर्व गावांमध्ये दवंडी देऊन या संदर्भात सूचना दिल्या आहेत. यापुढेही पाणी उपसा सुरु राहिला तर जप्तीची कारवाई केली जाईल, असे पथकप्रमुख नायब तहसीलदार ए.एन. नवगिरे यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीPower Shutdownभारनियमनagricultureशेती