शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

परभणी : मानवत रोड-पाथरी रेल्वेमार्गाबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:35 AM

मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक दिवसांपासून लावून धरली असून या संदर्भात त्यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी मोघम उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग करण्याची मागणी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक दिवसांपासून लावून धरली असून या संदर्भात त्यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी मोघम उत्तर दिल्याची बाब समोर आली आहे.श्री साईबाबांचे जन्मस्थळ असलेले पाथरी देशाच्या रेल्वेच्या नकाशावर यावे, जेणेकरुन या भागाचा विकास व्हावा. तसेच श्री साईबाबांच्या देशभरातील भक्तांना पाथरीत येणे सुकर व्हावे, या व्यापक दृष्टीकोनातून आ.बाबाजानी दुर्राणी यांनी मानवत रोड ते पाथरी हा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी ३ वर्षांपासून पाठपुरावा चालविला आहे. पाथरीपासून पुढे सोनपेठमार्गे परळी हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे रेल्वेचे अंतर कमी होईल. ही देखील या मागची आ.दुर्राणी यांची भूमिका होती. या अनुषंगाने त्यांनी ७ आॅगस्ट २०१७ रोजी विधानपरिषदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये मानवत रोड ते पाथरी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील १६ कि.मी. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत परभणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आहे का? असल्यास परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांनी ३ मार्च २०१७ रोजी वा त्या सुमारास रेल्वे मंत्रालयाकडे विनंती केली आहे का? असल्यास रेल्वे मंत्रालयाने केलेल्या कार्यवाहीची मागणी दिली आहे का? असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का? त्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आहे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.या प्रश्नावर तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ८ मार्च २०१९ रोजी लेखी उत्तर दिले. हे उत्तर नागपूर येथे सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ.दुर्राणी यांना प्राप्त झाले. त्यामध्ये रावते यांनी या संदर्भातील निवेदन प्राप्त झाल्याचे सांगून गृह विभागाच्या विशेष कार्यकारी अभियंत्यांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयास विनंती करणारे पत्र पाठविले आहे. राज्यातील विविध मार्गाचे तसेच रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी शासनस्तरावर बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येतो, एवढीच मोघम व या रेल्वेमार्गाचा उल्लेख नसलेली माहिती लेखी स्वरुपात दिली आहे. यातूनच या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी राज्य शासनस्तरावर कशी चालढकल केली गेली आहे, हे स्पष्ट होते.लोकप्रतिनिधींचीच पाठपुरावा करण्याची गरज४मानवतरोड ते पाथरी हा रेल्वेमार्ग पहिल्या टप्प्यात होऊन त्यापुढे पाथरी- सोनपेठ ते परळी हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास विकासापासून कोसोदूर असलेले मानवत, पाथरी व सोनपेठ हे तालुके देश पातळीवरील रेल्वेच्या नकाशावर येतील.४जेणेकरुन या भागाचा विकास होण्यास मदत होईल. तसेच श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळी दर्शनासाठी देशभरातून येणाºया भाविकांची सोय होणार आहे. असे असताना राज्य पातळीवर यासाठी उदासिनता दिसून येत असल्याने आता जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनाच यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.४याकरीता सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजुला सारुन मुंबई व दिल्लीत आपले राजकीय वजन खर्ची घालणे आवश्यक आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेministerमंत्रीMarathwadaमराठवाडा