शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

परभणी जिल्हा: वर्षभरात ४८३ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:28 AM

जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़

चंद्रमुनी बलखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरात जून २०१७ ते मे २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक व बालकांचा मृत्यू झाला आहे़ या मृत्यूमागे विविध कारणे असले तरी बालमृत्यूचे प्रमाण लक्षात घेता मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे़राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर माता, स्तनदामाता यासह बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात़ मानव विकास मिशन अंतर्गत बुडीत मजुरीसह बालकांच्या पोषणासाठीही शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून दिला जातो़ मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, मृत्यूदर पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याचे दिसून येत आहे़ परभणी जिल्ह्यात जून २०१७ ते मे २०१८ या कालावधीत ४८३ उपजत, अर्भक, बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे झाली आहे़वर्षभरात २२ हजार ५४१ बालकांचा जन्म झाला़ जन्मदराचे प्रमाण १७़९६ टक्के आहे़ असे असले तरी मृत्यूचे प्रमाणही पाहिजे त्या तुलनेत कमी होत नाही़ जिल्हाभरात १८५ उपजत बालकांचा मृत्यू झाला़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ९, पाथरी १३, परभणी ४४, जिंतूर ३०, पालम १७, पूर्णा २१, सेलू ४० तर मानवत तालुक्यात ११ उपजत बालकांचा समावेश आहे़ उपजत मृत्यूचा दर ८़२१ आहे़ ० ते १ वर्ष वयोगटातील २३६ अर्भकांचा वर्षभरात मृत्यू झाला़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ९, पाथरी १६, परभणी ६७, जिंतूर ३५, पालम २१, पूर्णा ३१, सेलू ४०, सोनपेठ ३ तर मानवत तालुक्यात १४ अर्भकांचा समावेश आहे़अर्भक मृत्यूचा दर १०़४७ आहे़ यासोबत १ ते ५ वर्षे वयोगटातील ६२ बालकांचा मृत्यू झाला़ यामध्ये परभणी तालुक्यातील ५ बालकांचा समावेश आहे़ पाथरी तालुक्यातील ६, परभणी १०, जिंतूर १७, पालम २, पूर्णा १७ तर मानवत तालुक्यातील ५ बालमृत्यूचा समावेश आहे़ बालमृत्यूचा दर १३़२२ एवढा आहे़२२ हजार ५४१ बालकांचा जन्मजून २०१७ ते मे २०१८ या कालावधीत जिल्हाभरात २२ हजार ५४१ बालके जन्मली आहेत़ यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५९ बालके जन्मली़ पाथरी तालुक्यात १ हजार ७७०, परभणी तालुक्यात ३ हजार ९१६, जिंतूर तालुक्यात ४ हजार १७१, पालम तालुक्यात २ हजार ४३, पूर्णा तालुक्यात २ हजार ६२८, सेलू १ हजार १०२, सोनपेठ १ हजार ४३९, मानवत १ हजार ४१३ असा २२ हजार ५४१ बालकांचा वर्षभरात जन्म झाला़एका गरोदर मातेचा समावेशशासनाच्या वतीने गरोदर मातांसाठी बुडीत मजुरी, पंतप्रधान मातृवंदना योजना राबविण्यात येतात़ या काळामध्ये मातांना आराम मिळावा, हा उद्देश आहे़ विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी परभणी तालुक्यातील एका गरोदर मातेचाही मृत्यू झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHealthआरोग्यDeathमृत्यू