शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

परभणी : गंगाखेड, जिंतूर, पूर्णेत दुष्काळ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:33 AM

जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळासृदश्य परिस्थिती जाहीर केली होती़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यांत गंभीर तर परभणी, पालम व सेलू तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले होते़ आता केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले़ त्यामध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची सत्यमापन समितीकडून तपासणी करण्यात आली़ त्यातील निष्कर्षानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने राज्यातील १८० तालुक्यांपैकी २९ तालुके या यादीतून वगळले आहेत़ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांपैकी ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा तर २९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़या यादीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर या तीन तालुक्यांचा समावेश होईल, असे वाटले होते; परंतु, या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३१ आॅक्टोबरच्या आदेशानुसार निराशा झाली आहे़ यापूर्वी मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले परभणी, पालम व सेलू हे तीन तालुके आता गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत़ या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कतरता, दूरसंवेदन विषयक निकष, मृदू आर्द्रता, पेरणीचे क्षेत्र व पिकांची स्थिती आदी बाबींचा अभ्यास करून तालुक्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत़सुधारित हंगामी पैसेवारीचा कौल गंगाखेड, जिंतूरच्या बाजुने४महसूल विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या परभणी तालुक्याची पैेसेवारी ४४ पैसे, पालम ४० पैसे, पाथरी ४२.५७ पैसे, सोनपेठ ४३.९२, मानवत ४२.४९, सेलू ४६ पैसे अशी आहे. तर गंगाखेड तालुक्याची ४३.७९ व जिंतूर तालुक्याची ४७ पैसे सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित झाली आहे. या दोन्ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून या संदर्भात सुधारित निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. पूर्णा तालुक्यात मात्र महसूलच्या अहवालानुसार ९४ ते ९५ टक्के पाऊस झाल्याने ५४.२५ पैसे सुधारित पैसेवारी आली आहे. त्यामुळे हा तालुका सध्या तरी दुष्काळ जाहीर होण्यापासून बराच दूर आहे. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर दुष्काळाची खरी परिस्थिती जाहीर होणार आहे.४७९ गावांना सवलती४दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७९ गावांना दुष्काळाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १११, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६० व सेलू तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे़४या ४७९ गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कर्जाचे पूनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोच्या कामात शिथिलता, आवश्यक तेथे पाण्याच्या टँकरचा वापर व दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांंनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार