शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

परभणीत इंटरनेट सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:47 IST

परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरातील बीएसएनएलचीइंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़परभणी जिल्ह्यात बीएसएनएलची इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे़ ब्रॉडबँड इंटरनेट तसेच मोबाईलवरून इंटरनेट वापरले जाते़ खाजगी कंपन्यांनी इंटरनेट सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचविली असताना भारतीय दूर संचार निगमने मात्र आपली सेवा ग्राहकाभिमूख करण्याऐवजी या सेवेत अडथळे वाढविले आहेत़ परभणी शहरासह जिल्हाभरात ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट वापरणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ मोबाईल ग्राहकांची संख्याही अधिक आहे़ मात्र इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय दूर संचार निगमची सेवा कुचकामी ठरत आहे़ वारंवार सेवा विस्कळीत होणे, इंटरनेटची गती कमी होणे असे प्रकार घडत असून, ग्राहक केवळ सेवा मिळत नसल्याने खाजगी कंपन्यांचे इंरटनेट वापरण्यावर भर देत आहेत़येथील भारतीय दूर संचार निगमच्या कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही़ त्यामुळे ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागते़ परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय दूर संचार निगमच्या माध्यमातूनच ब्रॉडबँडची सेवा पुरविली जाते़ ठिक ठिकाणी केबल अंथरून ब्रॉडबँड इंटरनेट पुरविले जात आहे़ असे असताना ही सेवा ग्राहकाभिमूख होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, गुरुवारी सकाळी १० वाजेपासून परभणी शहरातील अनेक भागांमध्ये भारतीय दूर संचार निगमचे इंटरनेट बंद पडले़ त्यामुळे ग्राहकांची कामे खोळंबली़ ही इंटरनेट सेवा कधी पूर्ववत होते, याची प्रतीक्षा करावी लागली़अखेर चार तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत झाली़ भारतीय दूर संचार निगमच्या परभणी कार्यालयाकडे या संदर्भात विचारणा केली असता, नांदेड येथूनच इंटरनेट सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले़व्यावसायिकांना आर्थिक फटकासर्वसाधारणपणे घरगुती वापरासाठी खाजगी कंपन्यांचे इंटरनेट मोबाईलच्या माध्यमातून वापरले जात असले तरी व्यावसायासाठी मात्र भारतीय दूर संचार निगमच्या इंटरनेट सेवेलाच प्राधान्य दिले जाते़ त्यामुळे बीएसएनएलची सेवा वापरणाºया व्यावसायिक ग्राहकांची संख्या अधिक आहे़ ही सेवा ठप्प झाली तर ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते़ त्यामुळे ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटBSNLबीएसएनएल