शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

परभणीचा पारा ५.१ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:14 AM

१९ डिसेंबरपासून तापमानात बदल होण्यास प्रारंभ झाला. १२.३ अंशावरून पारा थेट ७ अंशापर्यंत घसरल्याने जिल्हाभरात वातावरण गारठले आहे. थंडीमुळे ...

१९ डिसेंबरपासून तापमानात बदल होण्यास प्रारंभ झाला. १२.३ अंशावरून पारा थेट ७ अंशापर्यंत घसरल्याने जिल्हाभरात वातावरण गारठले आहे. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्व व्यवहार उशिराने सुरू होत आहेत. पहाटेच्या सुमारास थंडीसह धुक्याची चादर पसरत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत थंडीचा असर रहात असून, सायंकाळी ६ वाजेनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होत आहे. उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील नीचांकी तापमान जिल्ह्यात नोंद केले जात आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २२ डिसेंबर रोजी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ५.१ अंश किमान तापमान राहिले आहे. हे तापमान या वर्षीच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. आणखी काही दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

असा घसरला पारा

१९ डिसेंबर : १२.३ अंश

२० डिसेंबर : ७ अंश

२१ डिसेंबर : ५.६ अंश

२२ डिसेंबर : ५.१ अंश