शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

परभणी : प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली रामपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:04 AM

प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रभू श्रीराम वनवासात असताना मानवत तालुक्यातील रामपुरी परिसरात काही काळ ते वास्तव्याला होते. त्यामुळेच या गावाला रामपुरी, असे नाव पडले. त्याचबरोबर याठिकाणी हनुमानाची एकूण बारा मंदिरे आहेत, त्यामुळे बारा हनुमंतांची रामपुरी, अशी या गावाची ओळख आहे.गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. सुपीक जमीन, गोदावरीच्या प्रवाहामुळे पाण्याची मुबलक सुविधा अशी नैसर्गिक सुबत्ता गाव परिसरात आहे. या गावाला पौराणिक महत्त्व प्राप्त झाले असून गावाच्या शिवारामध्ये प्रभू श्री रामचंद्राचे वास्तव्य असल्याचे दाखले पुराणात मिळतात. गावातील हनुमानाच्या मुख्य मंदिरासोबतच मोठा मारुती, नवरा हनुमान, दसरा हनुमान, शनी हनुमान अशी गावामध्ये पाच हनुमानाची मंदिरे आहेत तर परिसरातील शेतशिवारात सहा मंदिरे असून, या मंदिरामुळेच या गावाला बारा हनुमंताची रामपुरी, अशी ओळख निर्माण झाली, अशी माहिती कांता महाराज जोशी, नारायण पुजारी यांनी दिली. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमृता आणि पवित्रा या दोन नद्या या ठिकाणी गोदावरी नदीत मिसळतात. त्यामुळे नद्यांचा त्रिवेणी संगम येथे आहे. हनुमान मंदिराबरोबरच गावांमध्ये महादेव मंदिरांचीही शृंखला पाहावयास मिळते. त्यात स्वयंभू मूर्ती असलेले मल्लीकर्जून मंदिर, पापदंडेश्वर, खंडेश्वर, रामेश्वर, काशी विश्वेश्वर, खंडेश्वर, गोकर्णेश्वर, नर्मदेश्वर अशी महादेवाचे मंदिर या ठिकाणी आहेत. या सर्व मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुरातन मंदिरामुळे या गावाला मोठा पौराणिक वारसा निर्माण झाला आहे.अधिकाऱ्यांचे गाव म्हणूनही ओळख४परभणी शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर मानवत तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या रामपुरी या गावाला पौराणिक वारस्यामुळे मूळ ओळख असली तरी येथील गावकऱ्यांनी या गावाला अधिकाºयांचे गाव, अशी नवी ओळख प्राप्त करून दिली आहे. गावातील युवकांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यातल्या विविध भागात प्रशासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.४येथील रहिवासी असलेले अनेकजण प्रशासनात ठिक ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या अधिकाºयांची गावाशी अजूनही बांधीलकी असून प्रत्येक महिन्यात ते या ठिकाणी येऊन सामाजिक उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये दाखल होणाºया अधिकाºयांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यामुळेच या गावाला आता अधिकाºयांचे गाव म्हणूनही ओळख प्राप्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious Placesधार्मिक स्थळे