शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

परभणी : २५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दहा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:20 AM

जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.परभणी जिल्ह्यातील औद्योगिक, घरगुती व वाणिज्य या ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वाढत आहे. ही थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने मुंबई येथील महावितरण मुख्यालयातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने विशेष १० वसुली पथकांची नेमणूक केली आहे. या पथकात औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड व परभणी येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परभणी शहराबरोबरच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसह वीज चोरी करणाºया ग्राहकांची तीन दिवस झाडाझडती घेतली जाणार आहे.परभणी विभाग क्रमांक १ मध्ये लघुदाब प्रकारातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ५ हजार ६९६ वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१८ अखेर ११० कोटी ७५ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर विभाग क्रमांक २ मधील ९८ हजार १८८ ग्राहकांकडे १३९ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे एकूण २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडे २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ कार्यालयाने जिल्ह्यासाठी नेमलेल्या एका- एका पथकामध्ये ५ ते १० अधिकाºयांचा समावेश आहे. ही दहाही पथके २९ आॅक्टोबर रोजी शहरात दाखल झाली.३० आॅक्टोबर रोजी या पथकांनी परभणी येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.वीज चोरीवर आळा घालण्यासाठी मोहीम४वीज बिल थकबाकी वसुल करण्याबरोबरच वीज चोरीवर आळा घालण्याच्या उद्देशाने २९ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या स्थैर्यासाठी वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. सणासुदीचे दिवस पाहता वीज ग्राहकांनीही चालू वीज बिलासह आपल्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरुन वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.कृषीपंपांना वगळले४जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंपाच्या वीज बिलाची वसुली थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाने थकबाकी वसुलीसाठी नेमलेल्या पथकाकडून औद्योगिक, वाणिज्य व घरगुती वीज ग्राहकांचीच वसुली करण्यात येणार आहे. कृषीपंपांना या मोहिमेतून वगळल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणlaturलातूरNandedनांदेड