शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार; शेकडो घरात शिरले पाणी, पुरात अडकली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 7:09 PM

rain in parabhani : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले.

ठळक मुद्देबनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम-ताडकळ महामार्ग बंद

पालम : पालम तालुक्यात गोदावरी, लेंडी, गळाटीस सर्वच नद्या नाले, ओढ्यांना पूर आलेला आहे. पुरामुळे सहा सप्टेंबर रोजी च्या दुपारपासून तेरा गावांचा संपर्क तुटला. गळाटी नदीपलीकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी तर लेंडी नदीपलीकडील फळा, फरकंडा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी आणि गणेशवाडीचा संपर्क होऊ शकत नाही. दुसरीकडे अनेक गावांत पाणी शिरले आहे. जवळा येथील जिल्हा परिषदेच्या आठ खोल्यांमध्ये पाणी शिरले आहे. येथील अनेक घरांत पाणीच पाणी झाले आहे. चाटोरी ते माळेगाव दरम्यानचा राज्य महामार्ग देखील पुराच्या पाण्यामुळे तीन तास बंद होता. हीच गत तालुक्यातील बहुतांश गावात झाली आहे. 

पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्ग 361-एफ वरील केरवाडी गावालगत घडली. सदर बस जेसीबीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढण्याचे कार्य सुरू होते. राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी गावालगत गळाटी नदीवर पूल आहे. येथील पुलावरून गळाटी नदीचे पाणी वाहत असताना पालमकडून येणाऱ्या बसचालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. म्हणून चालकाने पूल पार करण्यासाठी बस पुढे नेली असता पाणी वाढत गेले. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. जवळपास 16 प्रवासी या बसमध्ये होते. ते जवळच्या केरवाडी गावात आले. परंतु बस पुराच्या पाण्यातच असून पाणी वाढत आहे. त्यानंतर बसचालकाने केरवाडी गावातून जेसीबी आणून ही बस पाण्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. हे कार्य सुरू होते.

बनवस येथे १०० घरांत पाणी शिरलेपालम तालुक्यात मागील २४ तासापासून संततधार पाऊस सुरूच असल्याने पावसाने हाहाकार माजविला आहे. पालम गंगाखेड राष्ट्रीय महामार्गसह पालम-ताडकळस राज्य महामार्गही बंद असून तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बनवस येथे १०० घरांत पाणी शिरले असून अनेक गावांमधील घरे पाण्याखाली आहेत. हा पूर १९९८ पेक्षाही मोठा आहे.

पालम-ताडकळ महामार्ग बंद; धानोरा पूल पाण्याखालीगोदावरी नदीला 6 सप्टेंबर रोजीच्या रात्रीपासून पूर आला आहे. पुराचे पाणी वाढत जाऊन 7 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत धानोरा काळे येथील पुलाला भिडले होते. दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी 364. 60 मीटर एवढी होती. म्हणून धानोरा काळे पुलावरून गोदावरी नदीचे पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली. पुलाच्या दोन्ही बाजूने काही वाहने थांबली आहेत. परंतु पाणी लवकर उतरेल, अशी शक्यता नाही. नदीकाठच्या गावांना पालम प्रशासनाने धोक्याचा इशारा दिलेला आहे.

हेही वाचा - - जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी