शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

पैठण डावा कालवा दुरुस्तीचे काम यांत्रिकी मंडळामार्फत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:13 AM

जायकवाडी धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे ; परंतु पैठण डावा कालवा नादुरूस्त असल्याने हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत ...

जायकवाडी धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे ; परंतु पैठण डावा कालवा नादुरूस्त असल्याने हे पाणी पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कारण पैठण कालव्यामध्ये १२२ ते २०८ व शाखा कालवा ७० व इतर शाखा कालव्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर गाळ साचलेला असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सोडलेले पाणी देखील गाळामुळे कालव्यातून व्यवस्थित पुढे जात नाही. त्याचबरोबर संबंधित कालव्यावर अनेक गेट नादुरुस्त आहेत. त्यामुळे देखील पाणी योग्य पद्धतीने वितरित न होणे व पाणी वाया जाणे अशा घटना घडत आहेत. त्यासाठी पैठण डाव्या कालव्याच्या गेटची तत्काळ दुरुस्ती जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या नांदेड येथील यांत्रिकी मंडळांच्या वतीने करण्यात यावी. या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. त्यानंतर कडू यांनी याबाबत जलसंपदा विभागाच्या सचिवांना बोलावून या कालव्याच्या दुरूस्तीचे काम नांदेड येथील यांत्रिकी मंडळामार्फत करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दुरूस्ती कामास सुरूवात कधी होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.