शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:18 AM

परभणी : कोरोनाच्या काळात एकीकडे निधीअभावी विकास कामे ठप्प असली तरी येथील वैधमापन शास्त्र विभागाने मात्र वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ ...

परभणी : कोरोनाच्या काळात एकीकडे निधीअभावी विकास कामे ठप्प असली तरी येथील वैधमापन शास्त्र विभागाने मात्र वजन-मापांच्या नूतनीकरणातून ७४ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा महसूल फेब्रुवारी अखेरपर्यंत शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

जिल्ह्यातील विविध व्यावसायिकांकडून पदार्थांच्या मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वजन-मापांचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे असते. या नूतनीकरणासाठी वैधमापन शास्त्र विभागाला दरवर्षी ठराविक उद्दिष्ट निश्चित करून दिले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने उद्दिष्ट देण्यात आले नाही. अशाही परिस्थितीत मागील वर्षाचे उद्दिष्ट ग्राह्य धरून वैधमापन शास्त्र विभागाने फेब्रुवारी महिन्याअखेर ७४ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

परभणी आणि हिंगोली अशा दोन जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या या कार्यालयात एकूण चार विभाग आहेत. परभणी १ या विभागाला १८ लाख ३० हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १५ लाख ३४ हजार २०४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. परभणी २ विभागात २० लाख १३ हजार ४३० रुपये, सेलू विभागातून १७ लाख ७८ हजार ९९० रुपये, तर हिंगोली विभागातून २१ लाख ४६ हजार ३५ रुपयांचा महसूल फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा करण्यात आला आहे.

बाजारपेठ भागातील व्यापारी, पेट्रोल पंप, औद्योगिक वसाहती, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन अशा शासकीय संस्थांसह किरकोळ विक्रेते, तसेच ज्या ज्या ठिकाणी वजनाचा वापर होतो त्या ठिकाणाहून हा महसूल एकत्रित केला जातो. त्याचप्रमाणे वजन-मापांमध्ये हेराफेरी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला दिले आहेत.

एकंदर मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. परभणी जिल्ह्याला विकास निधी प्राप्त झाला नसल्याने विकासकामेही ठप्प राहिली, अशाही परिस्थितीत वैधमापन शास्त्र विभागाने मात्र उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यंत मागील वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दीड लाखाचा दंड वसूल

वजन-मापांमध्ये हेराफेरी केल्याच्या कारणावरून जिल्ह्यात दंडात्मक कारवाई हाती घेण्यात आली. ५२ जणांकडून १ लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

११४८ व्यापाऱ्यांची नोंदणी

परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील ठोक, तसेच किरकोळ अशा एकूण १ हजार १४८ व्यापाऱ्यांची या विभागाकडे नोंदणी आहे. या व्यापाऱ्यांकडून वजन-मापांचे प्रत्येक वर्षी नूतनीकरण केले जाते. नूतनीकरणापोटी ठरवून दिलेल्या नियमानुसार ५ रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतचा मुद्रांक वसूल केला जातो.