शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:22 AM

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमधून दररोज हजारहून अधिक बसफेऱ्या करण्यात येतात. ...

परभणी विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमधून दररोज हजारहून अधिक बसफेऱ्या करण्यात येतात. यातून प्रवाशांची ने-आण करण्यात येते. मात्र मागील काही दिवसापासून नागरिकांच्या मनामधील कोरोनाची भीती अद्यापही दूर झालेली नाही. त्यामुळे एसटी बसेसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले. परभणी आगारामधून कोविडपूर्वी ९ बसेस ग्रामीण भागात मुक्कामी थांबत होत्या. मात्र, सद्यस्थितीत केवळ ८ बसेस मुक्कामी थांबतात. जिंतूर आगारातील १७ बसेस कोविडपूर्वी मुक्कामी थांबत असत. परंतू, आता या केवळ ६ बसेस मुक्कामी सोडण्यात येत आहेत. गंगाखेडमध्ये केवळ १६ बसेस तर पाथरी आगारातून केवळ १२ बसेस मुक्कामी पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे चार आगारातून पूर्वी ७० बसेस या ग्रामीण भागात मुक्कामी थांबून प्रवाशांची गैरसोय दूर करत होत्या. मात्र सद्यस्थितीत ४२ बसेस ग्रामीण भागात मुक्कामी थांबून प्रवाशांची ने-आण करत आहेत. ही संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत असून नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा प्रवाशांना घ्यावा लागत आहे.

शहरी भागात जाणाऱ्या गाड्या पुल्ल

परभणी तसेच अन्य आगारातून तालुक्याच्या ठिकाणी व राज्यातील विविध जिल्ह्यात शहरी भागात जाणाऱ्या बसेस सध्या फुल्ल होऊन धावत आहेत. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी बसेसला प्रतिसाद असतानाही त्या बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना जागा मिळेना

परभणी तालुक्यातील धर्मापूरी, टाकळी, आर्वी, पिंगळी, जिंतूर तालुक्यातील बोरी, कौसडी, वालूर यासह पूर्णा तालुक्यातील ताडकळस व अन्य तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण बसेसच्या दररोजच्या अनेक फेऱ्या होतात. यात सकाळी तसेच सायंकाळी या बसेसला प्रवाशांना जागा मिळत नाही.

मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास

जिंतूर आगारातून सध्या केवळ काही गावांनाच मुक्कामी बसेस सोडण्यात येतात. यामुळे अनेक गावांना जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. - अर्थव काळे, कौसडी.

ताडकळस तसेच फुलकळस या परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या बसेस मुक्कामी सुरु करण्यात याव्यात. या भागातून परभणी येथे दररोज शेकडो शेतकरी तसेच विद्यार्थी विविध कामासाठी जात असतात. यामुळे रात्री गावाकडे परतताना लवकर सुटणारी बस पकडून जावे लागत आहे. - उत्तम घाडगे, उखळद.