शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

उसाला क्विंटलमागे फक्त १० रुपये वाढ; केंद्र सरकारच्या निर्णयाची 'स्वाभिमानी'कडून होळी

By ज्ञानेश्वर भाले | Published: June 29, 2023 4:05 PM

उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला फक्त दहा रुपये वाढ

परभणी : ऊस एफआरपी रक्कमेत केवळ १० रूपये प्रति क्विंटल वाढ देणाऱ्या केंद्र सरकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गुरुवारी सरकारच्या या निर्णयाची होळी करण्यात आली. 

उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचा डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये वर्षभरात जवळपास ३३ टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये रासायनिक खतांची वाढ २२ टक्क्याहून होऊन वाढली आहे. यामुळे आज झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईमुळे व उत्पादन खर्चामध्ये जवळपास ५२ टक्केची वाढ झाली आहे. 

या सर्व गोष्टींचा विचार केल्यास पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला ३५० रुपयाची वाढ मिळाली आहे. या सर्व पार्श्भूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला. या वेळी किशोर ढगे, भास्कर खाटिंग, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, माऊली लोडे, अंकुश शिंदे, संजय शिंदे, रामेश्वर आवरगंड, शंकर भागवत, ज्ञानराज चव्हाण, उध्दव जवंजाळ, शंकर भागवत, माऊली शिंदे कार्यकर्ते हजर होते.

 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने