शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

सहा हजार हेक्टरवरील तुरीचे पंचनामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:13 AM

यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ...

यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बहुतांश पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. मात्र, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या हाती हे पीक लागले आहे, त्या शेतकऱ्यांनी या पिकावर मोठ्या खर्च करून हे पीक जगवले. मात्र, काढणीच्या वेळी हे तुरीचे पीक संपूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोरी कृषी मंडळांतर्गत येणाऱ्या १५९ शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी तालुका प्रशासनाकडे दोन आठवड्यांपूर्वी केली होती. मात्र, प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. दोन आठवडे उलटूनही पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी या पिकाकडे फिरकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाला नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.