शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 11:25 AM

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र.

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी) : दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. तर केवळ २४.१० टक्के पाणीपातळीतील तहानलेल्या निम्न दुधना प्रकल्पात सोमवारी सकाळी १० वा.पर्यंत ७०.८५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर  प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कळविले आहे.

३१ ऑगस्ट रोजी शनीवारी  निम्न दुधना प्रकल्पात २४.१० टक्के जिवंत पाणीसाठा होता. शनीवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रवीवारी पावसाने चांगलाच जोर धरला.रवीवारी सायंकाळपर्यंत पाणीपातळी २६.४४ टक्यावर गेली. सोमवारी सकाळी ६ वाजता जीवंत जलसाठा ६१.९३ टक्यावर गेला. तो सकाळी ८ वा ६६.५१ टक्केवरून १० वाजता ७०.८५ टक्के असा आहे. दोन दिवसात जवळपास ४६ टक्के पाणी वाढले. तर दुसरीकडं पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी भुसंपादना अभावी मावेजा मिळाला नसल्याने यादरम्यान शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन या धरणात पाणी साठवण क्षमता १०० वरुन ७५ टक्यावर आणलेली आहे. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ४ टक्के पाणीसाठा लागणार आहे. पाऊस सुरूच राहीला तर हे धरण ७५ टक्के भरेल. या पार्श्वभूमीवर सांडवा किंवा नदिपात्रात केंव्हाही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. पुर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपापल्या जनावरांची काळजी घेणे वित्त, जीवितहानी होऊ नये, याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भी. कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना सोमवारी पहाटे पत्र देऊन कळवीले आहे.

अशी वाढत गेली पाणीपातळीनिम्न दुधना प्रकल्पात पाणीपातळी शनीवारी सकाळी २४.१० टक्के होती.ती संततधार पावसाने रवीवारी रात्री ८ वा.२६.४४ टक्के अशी झाली. सोमवारी पहाटे २ वा. हि टक्केवारी ४९.९४ पर्यंत गेली.त्यानंतर २ तासांनी म्हणजे ४ वा.५५.७६ टक्के झाली. तर सकाळी ६ वा.पाणीपातळी ६१.९३ टक्के तर सकाळी ८ वा.६६.५१ टक्के तर १० वा.७०.८५ म्हणजे २४२.२०० दलघमी असा पाणीसाठा झाला.गेल्यावर्षी २ सप्टेंबर २०२३ रोजी या धरणात जिवंत पाणीसाठा २६.०७ टक्के(६३.१४२ दलघमी )होता.या तुलनेत सद्यस्थितीत ७०.५१  टक्के म्हणजे २४२.२०० दलघमी वर असा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

वाहतूक व्यवस्था ठप्प.दोन दिवसापासून जोरावर पावसाने कसुरा नदीला पुर आल्याने परभणी व पाथरी हि वाहतूक ठप्प झाली तर राजवाडी,हातनूर या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय परतूर मार्ग ही बंद आहे.एकंदरीत रवीवार रात्री पासून वाहतूक ठप्प आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरणparabhaniपरभणी