शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ९० कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:17 AM

परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीपैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून, ...

परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीपैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ९० कोटी रुपयांच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान केले. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाधित पिकांचा पंचनामा केला. जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार ९७० शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली. प्रशासनाच्या अहवालाप्रमाणे राज्य शासनाने मागील महिन्यात जिल्हा प्रशासनाला ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. दोन टप्प्यांत मदत अनुदान वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पावणेदोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. आणखी ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यासाठी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला असून, त्यातून शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यामुळे या निधीची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यातील एकाही तालुक्यात प्राप्त अनुदानाचे वाटप शिल्लक राहिलेले नाही. पुढील अनुदानाचा टप्पा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार निधी वितरणाची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हेक्टरी १० हजार रुपयांची मदत

जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने पूर्वी जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर या शासनाच्या जुन्या नियमानुसार मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने ९ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार बाधित पिकांसाठी ३ हजार २०० रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

तालुकानिहाय वाटप झालेला पहिला टप्पा

परभणी : ५३१.२३

सेलू : १८७२.०६

जिंतूर : १६९८.९०

पाथरी : १४२६.१५

मानवत : १०८८.५९

सोनपेठ : ८५९.४२

गंगाखेड : ११.३९

पालम : ३४४.४६

पूर्णा : ११८८.६८