शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

वयोगटाची मर्यादा कमी करूनही लसीकरण संथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:13 AM

कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे या उद्देशाने जिल्ह्यात लसीकरण सुरू ...

कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे या उद्देशाने जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, सद्य:स्थितीला हा प्रतिसाद कमी झाला आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असताना नागरिक मात्र केंद्रांकडे फिरकत नाहीत. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शासनाने नागरिकांच्या वयाची मर्यादा कमी केली. दोन दिवसांपूर्वी ३३ ते ४४ या वयोगटांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३८ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ३ हजार ८०० डोस केंद्रांना पुरविण्यात आले; परंतु पहिल्याच दिवशी केवळ २ हजार ६१२ नागरिकांनी लस घेतली. उर्वरित लसीचा डोस शिल्लक आहे. त्यामुळे वयोमर्यादा कमी केल्यानंतरही नागरिकांचा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.

२५ टक्के लसीकरण पूर्ण

जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. सहा महिन्यांच्या काळात केवळ २५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १८ लाखांपर्यंत आहे. त्यापैकी सगळ्यांचा सहा लाख बालकांचा समावेश आहे. उर्वरित १२ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले आहे. प्रत्यक्षात ३ लाख ९ हजार ५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यातही २ लाख ४४ हजार ८५६ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या केवळ ६४ हजार १४९ एवढीच आहे.

संसर्ग घटल्याचा परिणाम

कोरोनाचा संसर्ग घटल्याने आता लस कशाला घ्यायची? या भावनेतून अनेकजण लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवीत आहेत. त्यातच काही जणांनी कोणतीही लक्षणे नसतील तर कोरोनाची लस का घ्यावी? असा सवाल उपस्थित करीत लसीकरण करून घेतले नाही. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात येतात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.