शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

जायकवाडीत येणार पाणी: परभणीत फटाके वाजवून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:39 AM

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व धरणात अडवून नगर, नाशिक जिल्ह्यातील साखर सम्राटांनी मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध केला होता. मोठ्या संघर्षानंतर समन्यायी पाणी वाटपचा कायदा २००५ मध्ये तत्कालीन शासनाला करावा लागला; परंतु, या कायद्यालाही न जुमानता पाणी अडविणे सुरुच ठेवले होते. या प्रकरणी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायलयाने मराठवाड्याच्या बाजुने आदेश दिले. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक व नगर, नाशिकमधील पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी ७ टीएमसी पाण्याची तुट काढली. त्यानुसार ९ टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडणे अपेक्षित असताना अधिकाºयांनी वेळखाऊ भूमिका घेतल्याने डॉ.पद्मश्री विठ्ठलराव विखे व संजीवनी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करुन मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत झाले. शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव कॉ. विलास बाबर, अभिजीत जोशी, एकनाथराव साळवे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, माणिक सूर्यवंशी, भूजंगराव धस, शिवाजी कच्छवे, किशन जगताप, भास्कर कच्छवे, गणेश बायस, सुरेश शिसोदे, बाजीराव सोगे, गणेश कच्छवे, ज्ञानोबा चंदेल, माणिकराव कच्छवे, गंगाधर जवंजाळ, नरसिंग कच्छवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण