शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

गळतीमुळे रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:30 AM

कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल ...

कराची वसुली मोठ्या प्रमाणात केली

परभणी : शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाने ही थकबाकी वसूल करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस पथकांची स्थापना केली होती. मात्र अजूनही कर वसुली फारसा प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षापासून करवसुली थकलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे.

घरकुलांची बांधकामे रखडली

परभणी : जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले असून, ही वाळू खरेदी करून घरकुल बांधणे परवडत नसल्याने लाभार्थ्यांनी बांधकाम बंद ठेवले आहे. प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

गुटखा विक्रीला लागेना लगाम

परभणी : जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत असून, पोलीस प्रशासन दररोज कारवाई करीत असले तरी शहरात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रस्ता उखडल्याने वाहनधारक त्रस्त

परभणी : शहरातील सुपर मार्केट ते वसंतराव नाईक यांचा पुतळा हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. ठीक ठिकाणच्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच मनपाने जलवाहिनीसाठी खड्डे खोदल्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीच भर पडली आहे. विशेष म्हणजे हा प्रमुख मार्ग असून दररोज शेकडो वाहनधारक या मार्गावर वाहतूक करतात. दुरुस्तीची मागणी होत आहे.

जिल्ह्यात वाढली मास्कची विक्री

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर केला जात आहे. शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला थांबून मास्क विक्री केली जात असून नागरिकांकडूनही मात्र चांगलीच मागणी होत आहे.

चारही बाजूचे रस्ते उखडले

परभणी : शहरात येणारे चारही बाजूची रस्ते उखडले असून नागरिक त्रस्त आहेत. परभणी-पाथरी, परभणी-जिंतूर, परभणी-गंगाखेड आणि परभणी- वसमत या चारही रस्त्यांवर खड्डे असल्याने शहरात दाखल होण्यासाठी वाहनधारकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात सर्वच रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणांचा वाहतुकीला त्रास होत असून अतिक्रमण हटविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. मनपाने मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. बाजारपेठेत अतिक्रमणांमुळे वाहतूक विस्कळीत होते. मात्र अतिक्रमणे हटविली जात नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे.