शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

राज्य शासनाकडून चळवळीवर मीठ चोळण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:22 AM

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी जिल्ह्यात चळवळ उभी केली असताना पीपीई तत्त्वावरचे वैद्यकीय ...

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी जिल्ह्यात चळवळ उभी केली असताना पीपीई तत्त्वावरचे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन राज्य शासनाने परभणीकरांच्या चळवळीवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा आरोप माजी आ.विजय गव्हाणे यांनी केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर भाजपाचे माजी आ.विजय गव्हाणे यांनी ५ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन परभणीकर संघर्ष समितीची भूमिका विषद केली. यावेळी सुभाष जावळे, रामेश्वर शिंदे, बाळासाहेब भालेराव आदींची उपस्थिती होती. गव्हाणे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणीत सुरू केलेल्या चळवळीचे आम्ही समर्थनच करतो. कारण तो संपूर्ण परभणीकरांचा प्रश्न आहे. मात्र एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन होत असताना परभणीतील लोकप्रतिनिधी आणि आंदोलकांशी चर्चा करुन राज्य शासनाने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता पीपीई तत्त्वावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे म्हणजे हा चळवळीचा अपमान आहे. राज्य शासनाने ६०: ४० च्या कोट्यातून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्यावे, असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविला नाही. हा प्रस्ताव आधी राज्य शासनाने पाठविणे आवश्यक आहे. राज्य शासनाची इच्छाशक्ती असेल तर परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊ शकते. मात्र राज्याने त्यांच्या हिश्य्याचा ६० टक्के निधी वाचविण्यासाठी सरळ-सरळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये विकायला काढली आहेत. पीपीई तत्वावरचे वैद्यकीय महाविद्यालय परभणीकरांना केव्हाच परवडणारे नाही. अशा महाविद्यालयातील वैद्यकीय उपचार, वैद्यकीय शिक्षण सर्व काही विकाऊ आहे. परभणी येथे सर्व पायाभूत सुविधा आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यायलाचे पहिले वर्ष सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी संख्या, ओपीडी या ठिकाणी मिळू शकते. त्यामुळे आजच्या घडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू करता येते, असा अहवाल राज्य शासनाच्याच सहस्त्रबुद्धे समितीने दिला आहे. असे असताना टेंडरींग पद्धतीचे विकाऊ शासकीय महाविद्यालय का मंजूर केले? असा सवाल गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचमंजूर झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी परभणीकर संघर्ष समितीची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.